भारतीय शिक्षण व्यवस्था: 'विश्वगुरू' की 'बेरोजगारांची फॅक्टरी'? (एक सत्य परिस्थिती)
वैदिक काळापासून डिजिटल युगापर्यंतचा प्रवास... भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया इ.स. पूर्व ५०० पासून रचला गेला आहे. एकेकाळी नालंदा आणि तक्षशीला सारखी विद्यापीठे जगाला ज्ञान देत होती. आज विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था आहे. पण प्रश्न हा आहे: "आज आपण खरोखर प्रगती केली आहे का?" 🤔 📊 धक्कादायक वास्तव (Data Speaks): GER (Gross Enrolment Ratio): २०१६-१७ मध्ये फक्त २५.२% मुले उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत होती. जागतिक तुलना: अमेरिकेत हे प्रमाण ४३.३९% आणि चीनमध्ये ८५.८% आहे. लोकसंख्येचा स्फोट: स्वातंत्र्यावेळी ३३ कोटी असलेली लोकसंख्या आज १३२ कोटींच्या पुढे गेली आहे, पण त्या प्रमाणात गुणवत्ता वाढली का? 🎯 उच्च शिक्षणाची ४ प्रमुख उद्दिष्टे केवळ डिग्री वाटणे हे शिक्षण नाही. भारतीय शिक्षणाचे ४ खांब आहेत: ✅ प्रवेश आणि समानता (सर्वांना संधी) ✅ सुसंगती (काळाची गरज) ✅ गुणवत्ता (Quality Matters) ✅ संशोधन (Innovation) कोठारी आयोग आणि 'NEP' ने हेच सांगितले आहे, पण आजही रोजगारक्षमता (Employability) हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ...